Posts

रामपुरी व विश्वगयाची प्रेरणादायी भेट! लेखक - महारुद्र मंगनाळे

Image
 रामपुरी व विश्वगयाची प्रेरणादायी भेट! लेखक - महारुद्र मंगनाळे  ............................................... लोकांना शहाणं करतोय म्हणून पोपटपंची करणाऱ्यांची संख्या समाजात अफाट आहे. वेगळ्या पातळीवर हा ही पोटापाण्याचा धंदाच! स्वत: प्रत्यक्ष काहीच कृती न करता,इतरांनी काय करावं,असं सांगणाऱ्या व्यक्तींपासून मी चार हात दूर राहातो.त्यातही हायफाय समाजसेवक म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांशी संपर्क होऊ नये याची काळजी घेतो.पत्रकार म्हणून असे अनेक भंपक लोक मी बघितलेत.त्यामुळं ओमप्रकाश यादव यांचा मला पहिल्यांदा व्हाट्सएप संदेश आला तेव्हा मी त्याला कोरडेपणाने प्रतिसाद दिला. याचं कारण त्यांच्या मागे जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीओ हे पद होतं. पण दुसऱ्या एका मित्राने कळवलं की,त्यांनी त्यांच्या गावात खूप चांगलं काम केलयं.हजारो झाडं लावून जोपासलीत.मग मी त्यांना रुद्रा हटला यायचं निमंत्रण दिलं.सहकुटुंब आले.त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की,हे माझ्याच जातकुळीतील आहेत. भरपूर काम करून,सकारात्मक प्रसिद्धी करणाऱ्यांपैकी एक आहेत.त्या भेटीत छान चर्चा झाली. जाताना त्यांनी रामपुरी(बु.)या त्यांच्या गावी ...

माती आडवा पाणी जिरवा च्या माध्यमातून कडवंची झाले समृद्ध

Image
कडवंची हे गाव जालना शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असून सुमारे 455 कुटुंब  व 3000 लोकसंख्या असलेले गाव आहे. कडवंची गावाची एकूण क्षेत्रफळ भौगोलिक क्षेत्रफळ 1807 हेक्‍टर एवढे असून लागवडी योग्य क्षेत्र सुमारे 1400 हेक्टर आहे.1995 पूर्वी म्हणजे फक्त 167 हेक्टर क्षेत्र( 13 टक्के) बागायती होते. कडवंची गाव अवर्षण प्रवण क्षेत्रात असून वार्षिक सरासरी पाऊस सुमारे 450 मिलिमीटर एवढा पडतो. 1995 पूर्वी या गावातील 400 ते 500 लोक ऊस तोडण्यासाठी बाहेर जात असत.  दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी शासकीय दौऱ्यानिमित्त कृषी विज्ञान केंद्र जालना यांचे पाणलोट क्षेत्र विकास मॉडेल कडवंची या गावी भेट देण्याचा योग आला. यावर एकच उपाय होता तो म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास. श्री विजय अण्णा बोराडे यांच्या दूरदृष्टीतून, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या पुढाकारातून व नाबार्डच्या अर्थसहाय्याने पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये माथा ते पायथा अशाप्रकारे काम करण्यात आले, असे श्री. वासरे कृषी अभियंता तथा प्रकल्प संचालक कडवंची यांनी सांगितले. कडवंची येथील जलसंधारणाचे वैशिष्ट्य म्हणजे माती...

प्रतिभावंताच्या प्रदेशात - राजा पुजारी

Image
क्षितीजाला पंखाच्या कवेत घेणारा अवलिया अधिकारी   अधिकारी पद मिळणं किंवा मिळवणं एवढं सोपं काम नाही परिश्रमाच आणि मेहनतीचं, कार्याच आणि कर्तृत्वाचं मोल त्यासाठी द्यावं लागतं. अत्यंत जीवघेण्या स्पर्धेच्या लोकसेवा आयोगाच्या अग्नि परीक्षेतून तावून सुलाखून निघाव लागतं. तेव्हा तो अधिकारपदाच्या शिखरावर विराजमान होतो. एकदा ध्येय साध्य झाले म्हणजे प्रवास संपत नाही. आता तर  त्याच्या कार्याचा  श्रीगणेशा झालेला असतो. आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा, कार्यशैलीचा, सर्वसमावेशकतेचा, क्षिरनिर विवेकाचा अवलंब करून निर्णय घेण्याचा, प्रशासनातील विविध कौशल्याचा व आपल्या अधिकार पदाचा सर्वसामान्यांच्या भल्यासाठी उपयोग करावा लागतो. तेव्हा जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवता येते. आणि मग असा अधिकारी जनतेच्या मनातील ताईत बनतो. या सर्व परीक्षेत पारंगत असणाऱ्या आणि आपल्या पंखांनी क्षितिज कवेत घेणाऱ्या अवलिया अधिकाऱ्यांमध्ये परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांचा उल्लेख करावा लागेल.  ओमप्रकाश मं. यादव ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद, परभणी. सत्तेची खुर्ची जशी ...

लोकसहभागाची पंचसूत्री- अर्थात पंचदान

1.श्रमदान 2.वेळ 3.कौशल्य 4.बुद्धी 5.पैसा ★प्रत्येक मनुष्याकडे वरील पैकी एक किंवा अधिक प्रकारचे दान करण्याची क्षमता किंवा पात्रता असते . ★ज्याला जे जमेल ते त्याने दिले पाहिजे कुणी काय द्यावे हा ज्याचा त्याचा विकल्प आहे. ★कुणालाही जबरदस्ती करण्यात येऊ नये प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने सामील होणे आवश्यक आहे. ★ वरील पंचदानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो. ©ओमप्रकाश मं. यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद, परभणी

माझं गाव माझं तीर्थ

आपण सर्वांनी खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. ★आपली गावे समग्र विकासात मागे का राहत आहेत ? ★आपण गावाचा विकास होण्यासाठी कोणते प्रयत्न करतो? ★गावाचा विकास करण्यासाठी फक्त शासकीय योजनावर अवलंबून राहणे आवश्यक आहे काय ? ★आपण सर्व ग्रामवासी मिळून काही करू शकत नाही का ? आपण काय करावे ? "रिकामा कशाला फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ"  या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे सर्व गावकऱ्यांनी "माझं गावच माझं तीर्थ" समजून श्रम,वेळ, कौशल, बुध्दी व वित्त या पंचदानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे . "आपण गावाचं देणं लागतो"  या भावनेने प्रेरित होऊन गावखेड्याची तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उत्साहाने समाज कार्यात सहभागी होऊ लागली तर गावाचे समग्र परिवर्तन शक्य आहे. ★आपण सर्वांनी मिळून गावाचे ऋण फेडण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले तर आपले गाव आदर्श होण्यास वेळ लागणार नाही ; ★आवश्यकता आहे ती फक्त सर्वांच्या इच्छाशक्तीची. ★सर्वांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकच संकल्प करणे आवश्यक आहे की, मला माझं...